जामखेड ः आपणा सर्वांचे व माझेही लाडके नेते आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासाठी मी बेरर चेक आहे. जनतेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कोणत्याही मागण

जामखेड ः आपणा सर्वांचे व माझेही लाडके नेते आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासाठी मी बेरर चेक आहे. जनतेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कोणत्याही मागण्या मान्यच होणार आहेत. असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले. देशाचा नेता निवडायची ही निवडणूक आहे. देश कोण सुरक्षित ठेऊ शकतो. सर्व सामान्यांना कोण न्याय देऊ शकतो. तर मोदींचे नेतृत्वच हे सक्षमपणे करू शकते तेव्हा डॉ. सुजय विखे यांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खा. सुजय विखे, आ. प्रा. राम शिंदे, आ. सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे, भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ, उमेश पाटील, डॉ. भगवान मुरूमकर, अशोक खेडकर, अजय काशीद, प्रा. सचिन गायवळ, सलीम बागवान, सचिन पोटरे, पवन राळेभात, मनोज राजगुरू, बाजीराव गोपाळघरे, रवि सुरवसे, शरद कारले, कैलास माने, महेश निमोणकर, सोमनाथ पाचरणे, प्रदीप टापरे, अर्चना राळेभात, अजिनाथ हजारे, संजीवनी पाटील, संध्या सोनवणे, प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांनाफडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे 24 पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे त्यांच्या ताळमेळ नाही त्यांच्याकडे सर्व इंजिन आहेत डब्बे नाहीत. यांच्या इंजीनमध्ये घराणेशाहीला जागा आहे, सर्व सामान्यांसाठी नाही. यापुढे पावसाच्या पुराच्या पाण्याचे डायवर्शन योजना सुरू करणार आहे. त्यामुळे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी नगर जिल्ह्यात वळवून तालुके दुष्काळमुक्त करू.
यावेळी खा सुजय विखे म्हणाले की, 2019 साली तुम्ही मला खासदार केले आपला विकास कागदावर नाही शहरात चार पदरी रस्ता होईल हे स्वप्नातही नव्हते. विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे, आचारसंहिता लागण्यापूर्वी गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते केले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास थांबला होता. समोरच्या उमेदवाराची माहिती पारनेरची जनता सांगतील त्यांनी खुप मोठी जनतेची पिळवणूक केली आहे. यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की 70 वर्षानंतर मतदार संघात मंत्री असतांना मोठा विकास केला या भागाची अडचण समजुन मला फडणवीस यांनी विधान परिषेदवर मला आमदार केले. विविध मागण्या करतांना कृष्णा भिमेचे पाणी जामखेड कर्जतला मिळाले पाहिजे. बाराशे एकरावर एमआयडीसीला मंजुरी दिली आता मोठ मोठ कंपन्यांचे उद्घाटन त्या एमआयडीसीच्या जागेत लवकरात लवकर करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आ प्रा राम शिंदे यांनी मागणी केली.
COMMENTS