Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना हक आणि अधिकार दिले-प्रा.श्रीरंग पवार

आष्टी प्रतिनिधी - ब्रम्हगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर,शिवराय,महात्मा फुले जयंती निमित्त सकाळी 9 वा शिवाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी मो

बोगद्यातील 41 कामगार सुरक्षित
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
मुंबई उच्च न्यायालयात 7 लाख खटले प्रलंबित

आष्टी प्रतिनिधी – ब्रम्हगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर,शिवराय,महात्मा फुले जयंती निमित्त सकाळी 9 वा शिवाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते,संध्याकाळी पाच वाजता मिरवणूक काढण्यात आली यानंतर सार्वजनिक जयंतीनिमित्त
डॉ बाबासाहेबांनी सर्वांना संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार दिले.’शिक्षण हे वाघीणेचे दुध आहे,जो पिणार तो गुरगरल्या शिवाय राहणार नाही’ असे प्रतिपादन प्रा.श्रीरंग पवार सर यांनी ब्रम्हगाव येथे केले.पुणे करार किती महत्त्वाचे होते त्यावेळी शिवरायांच्या काळात राज्य सुरक्षितता होती असे प्रतिपादन वामनराव निकाळजे सर यांनी भाषणात शिवराय ते भीमराय हा नारा दिला,गीत सादर केले,समाज सेवक सुनील सानप यांनी सांगितले की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे.सुत्रसंचलन रत्नकांत निकाळजे सर यांनी केले.यावेळी सरपंच रोहीदास पवार,उपसरपंच सानप,पत्रकार अण्णासाहेब साबळे,देशमुख,हराळ,शेख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.आभार कैलास निकाळजे यांनी मानले,जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष,व व्यवस्थापकीय मंडळानी कार्यक्रम दर्जेदार केले याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS