Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर

बुलढाणा प्रतिनिधी - कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे साठवून ठेवला आहे. केंद्र स

महाबळेश्‍वर महापर्यटन उत्सवाची समन्वयातून तयारी करावी : संतोष पाटील
कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलढाणा प्रतिनिधी – कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्यामुळे साठवून ठेवला आहे. केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांन विरोधात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. कॉटन लॉबीच्या दावाखाली केंद्र सरकारने येऊ नये. कापसावरचे आयात शुल्क स्थिर ठेवावे आणि केंद्र सरकारने कापूस आयात करू नये. कापसाच्या आणि सुताच्या उद्योगाला केंद्र सरकारने चालना दिली पाहिजे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. केंद्र सरकार जर कापूस उत्पादकांच्या विरोधात जात असेल तर केंद्र सरकारच्या विरोधात आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसाव लागेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

COMMENTS