उत्तर भारतात थंडीची लाट ; महाराष्ट्र गारठला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर भारतात थंडीची लाट ; महाराष्ट्र गारठला

मुंबई : उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, राजधानीत देखील हुडहुडी वाढली आहे. राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद झाली आहे. त्याठ

केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड
पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैद्य दारू साठा… | LOKNews24
विद्यार्थिनीनी हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या | LOKNews24

मुंबई : उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, राजधानीत देखील हुडहुडी वाढली आहे. राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद झाली आहे. त्याठिकाणी बर्ष पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट धडकली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात तीव्र थंडीची लाट धडकली आहे. महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सकाळी आणि सायंकाळी तापमान सरासरी तापमानापेक्षा खाली घसरत आहेत. त्यामुळे राजस्थानात थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. तर दिल्लीत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत दिल्लीतील तापमान 4 ते 5 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला
देशभरात थंडीचा कडाका वाढला असतांना, महाराष्ट्रात देखील रविवारी विविध जिल्ह्यांचे तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचे पहायला मिळाला. परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात 14 पर्यंत पारा खाली घसरला आहे.

COMMENTS