Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक ; शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने घडली घटना

मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट
तडजोडीच्या ‘राज’कारणाचा एसटी संपात प्रवेश!
माऊली दादा आणि सुदामदेव बाबा एकाच नाण्याच्या दोन बाजु-लक्ष्मण महाराज मेंगडे
Virar News Answer sheets of the 12th board exam were burnt in the teacher  house in virar | मोठी बातमी: 12 वी परिक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या  घरात जळून खाक; निकालावर परिणाम ...

मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. यावेळी घराला लागलेल्या आगीत या प्रश्‍नपत्रिका जळून खाक झाल्या असून, या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा हा यक्षप्रश्‍न बोर्डासमोर उभा ठाकला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, हा प्रकार मुंबईतील विरारमध्ये घडला आहे. विरारमध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. असे पेपर घरी आणता येतात का ?, ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजीपणा आहे, पेपर जाळले की जळाले याचा बोलींज पोलिस तपास करत आहेत.

COMMENTS