Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूर तालुक्यातील नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडाव्यात -आ.केराम

माहूर । प्रतिनिधीकिनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी रोजी माहूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्

एस. एस. पाटील यांची ‘बालभारती’ पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर निवड
श्री रेणुका देवी संस्थानला एका महिन्यात 1 कोटी 14 लाखांहून अधिकचे विक्रमी उत्पन्न
केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

माहूर । प्रतिनिधी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी रोजी माहूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या जनउपयोगी योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो आहे का, याची तपासणी करण्यात येणार असून, कामात अडवणूक करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. तहसील, पंचायत समिती, शिक्षण, महावितरण, कृषी, नगर पंचायत, सार्वजनिक बांधकाम, वन, आरोग्य व पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारींची लेखी निवेदने 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संबंधित पदाधिकार्‍यांकडे सादर करावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS