Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह सर्व सुविधा देऊ

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिपादन

पाथर्डी/प्रतिनिधी ः स्व.गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब विखे पाटील, राजीव राजळे यांचे ह्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे हे स्वप्न होते.

नगरपालिका वाचनालयात डॉ. हेडगेवार यांची जयंती उत्साहात
एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
संत ज्ञानेश्‍वर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पाथर्डी/प्रतिनिधी ः स्व.गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब विखे पाटील, राजीव राजळे यांचे ह्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे हे स्वप्न होते.हे स्वप्न आपण आता पूर्ण करणार आहोत.या मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच त्यांचे संगोपन देखील चांगले झाले पाहिजे.यासाठी पुढील काळात सातत्यपणे काम करणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगून लवकरच पाथर्डी तालुक्यात सीबीएससीची निवासी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन करणार असल्याचे जाहीर केले.धनगरवाडी येथे आयोजित जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ.मोनिका राजळे ह्या होत्या.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की मागील अडीच वर्षांत जे आघाडीचे सरकार होते.ते केवळ ठेकेदाराचे  काम करत होते.आधिकार्‍यांच्या दालनात आमचा सर्वसामान्य नागरिक हा तासनतास वाट बघत बाहेर थांबायचा आता हे सगळं बंद केले असून सर्वसामान्याचे हे सरकार आहे.त्यामुळे त्याच्या कामासाठी ना कुणाची गरज,ना चकरा मारण्याची गरज सरकार आता तुमच्या दारात येऊन तुम्हाला लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे ते तुम्हाला घरपोहच देणार असे खा.विखे यांनी सांगून आताचे शिंदे-फडणवीस सरकार आणि या सरकार मधील नंबर दोनचे खाते असलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गोरगरीबासाठीच काम करत आहेत.याचा आपल्या जिल्ह्यासाठी विशेष लाभ होणार आहे.जिल्ह्यात सर्व रखडलेले प्रकल्प तसेच विकास कामे हे पुढील वर्षांत पूर्ण करण्याचे यावेळी त्यांनी आश्‍वासन दिले. खा.विखे यांनी बोलताना असेही म्हणाले की जिल्ह्यात आम्ही सर्व एक आहोत.आमच्यात जमत नाही असा अपप्रचार हे विरोधक करत आहेत मात्र खरी गोष्ट ही वेगळीच आहे, जिल्हा बँक अध्यक्षाच्या निवडणुकीत हे आम्ही सिध्द करून दाखवले आहे. आमचे केवळ चार संचालक असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे अध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आता तुम्हीच सांगा कोणा कोणाचे कोणा कोणा बरोबर जुळते, आम्ही भाजप एकसंघ आहोत आणि आम्हा सर्वांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे आपला विकास, या साठी आपल्या सर्वांच्या खंबीर साथीची गरज आहे.आपण आमच्या पाठीशी असेच रहा हा विश्‍वास आम्हाला आहे. यावेळी आमदार राजळे यांनी बोलताना म्हटले की, तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही.प्रत्येक वाडीवस्तीवर विकासकामे केले जातील.तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार सरकारच्या वेगवेगळ्या योजनेतून रस्ते,पाणी,वीज, या मूलभूत कामाच्या मागणीनुसार तालुक्यात केले जाईल. या प्रसंगी अर्जुन शिरसाठ,अशोक चोरमले, माणिकराव खेडकर, अभय आव्हाड कशिताई गोल्हार,राहुल राजळे,राहुल करखिले,बंडू बोरुडे,बबन सबलस,मंगल कोकाटे,भिमराव फुंदे,विष्णूपंत अकोलकर,गोकुळ दौंड,धनजय बडे,सचिन वायकर, बाबा राजगुरु,अशोक गाडे,मिठू भाऊ चितळे,भाजप पदाधिकारी, जेष्ठ नेते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS