नवी दिल्ली /उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरूवारी चारधाम यात्रा तात्पुरती थांबव
नवी दिल्ली /
उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरूवारी चारधाम यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर सोनप्रयागजवळ भूस्खलन झाले आणि रस्ता बंद करण्यात आला.
यादरम्यान 40 भाविक अडकले. एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, भाविकांसाठी प्रवास मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यावरच यात्रा सुरू केली जाईल. गेल्या 4 दिवसांपासून राजस्थानमध्ये पाऊस सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर अजमेर शरीफ दर्गा संकुलात 2 फूट पाणी साचले होते.
त्याच वेळी मुसळधार पावसात, दर्गा संकुलात बांधलेल्या व्हरांड्याच्या छताचा एक भागही कोसळला. तथापि, या काळात कोणीही जखमी झाले नाही. दर्गा समितीने त्या भागातील लोकांची हालचाल थांबवली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मृतांचा आकडा 13वर पोहोचला आहे.
29 लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुरुवारी आणखी दोन मृतदेह सापडले. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा इशारा जारी केला असल्याने खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो.


COMMENTS