Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी विश्‍वास नांगरे पाटलांची होणार चौकशी

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. सदर हिंसाचा

कर्जबुडव्यांना अनुदान अन् घरगुती गॅस धारकांना महागाईदान
रुग्णांचा तडपून तडपून मृत्यू, नातेवाईकांची ऑक्सिजनच्या सिलिंडर्सवर झुंबड | पहा ‘सकाळच्या बातम्या’ Lok News24
ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. सदर हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यात 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे चौकशी करून त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार 1 जानेवारी 2018 घडला. तेव्हा विश्‍वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते, तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे. यात हर्षाली पोतदारची 21 व 22 जानेवारी, डॉ. शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्‍वास नांगरे पाटील यांची 24 व 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 व 25 जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे. उपरोक्त हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर सदर हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

याआधी अनेक पोलीस अधिकार्‍यांसह राजकीय नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यामध्ये आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावले होते. आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह आरोपी हर्षाली पोतदारची देखील चौकशी होणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अनेक वाहनांची जाळपोळ झाली, मालमत्तेचं नुकसान झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या अनुषंगाने पसरलेल्या अफवांमुळे औरंगाबाद, माजलगाव, परभणी, सोलापूर शहरांमध्येही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. औरंगाबादेतील उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, टाऊन हॉलसह अनेक भागात जमावाने दुकाने बंद केली होती. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता.

COMMENTS