Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालभारतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले : पाटील

राहुरी : बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीतून मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असते, बालभारतीची मराठी पुस्तके सर्व माध्यमातील शाळांन

श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको
देवळाली नगरपालिकेकडून 3 ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र
शिवांकुर पतसंस्थेला सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर

राहुरी : बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीतून मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असते, बालभारतीची मराठी पुस्तके सर्व माध्यमातील शाळांना उपयोगी आहेत. त्यामुळे बालभारती आज घरोघर पोहोचली असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने होते. यावेळी प्राचार्य अरुण तुपविहिरे, जितेंद्र मेटकर, बाबासाहेब पवार, बाळासाहेब खेत्री उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, शाळेचे विद्यार्थी भाग्यवान आहे की, ते ज्यांनी शिक्षणाचा पाया घालून दिला. त्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होत आहेत. यावेळी संस्थेचे सचिव महानंद माने जितेंद्र मेटकर, पत्रकार संजय कुलकर्णी, पत्रकार शिवाजी घाडगे, पत्रकार रियाज देशमुख यांनी मनोगत  व्यक्त केले. यावेळी पत्रकार आर.आर.जाधव,अशोक मंडलिक, राजेंद्र पवार, प्रसाद मैड, आकाश येवले, सचिन पवार, कृष्णा गायकवाड, देवराज मन्तोंडे, उदय धामने इ उपस्थित होते व आभार प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी मानले.

COMMENTS