Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारखान्यांचा धुराडे बंद; कर्जतकरांचा श्वास मोकळा

 वाहतूक शिस्तीसह बायपासचा प्रश्न ऐरणीवर कर्जत : यंदाच्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा श्वास सोडला आहे. ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस-रात्र धावणारी डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर, तसेच अवजड ट्रक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील सततची कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखर कारखाने सुरू असताना कर्जत शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून, ऊसाने भरलेली अवजड व लांबलचक वाहने एकापाठोपाठ एक धावत होती. परिणामी शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी, पादचारी यांना मनस्ताप सहन करावा लागे. विशेषतः आठवडे बाजारच्या दिवशी वाहतुकीची स्थिती अक्षरशः ठप्प होत होती. आता गळीत हंगाम संपल्यानंतर ही वाहने बंद झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र, नागरिकांचा हा दिलासा कायमस्वरूपी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी दुचाकी व चारचाकी वाहने अजूनही वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांच्या वेळेत वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला न लावता मधोमध किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केली जात असल्याने कोंडी होते. वास्तविक पाहता या वाहन चालकांना स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या मारून त्यातच वाहन उभे करण्याची अंमलबजावणी केली होती. त्यामुळे कोंडीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ही व्यवस्था हळूहळू नामशेष झाली. ही शिस्त पुन्हा लागू करून बेशिस्त वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे. बायपासशिवाय पर्याय नाही वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या पाहता कर्जत शहराचा मुख्य रस्ता भविष्यात अपुरा पडणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. केवळ रस्ता रुंदीकरण करून किंवा पार्किंगचे नियम लावून ही समस्या कायमची सुटणार नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरालगतून बायपास काढल्यास अवजड आणि अनावश्यक वाहने शहरात न शिरता बाहेरूनच मार्गक्रमण करतील, तर स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांसाठी मुख्य रस्ता मोकळा राहील. यासाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागासह विधान परिषदेचे सभापती  प्रा. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी  मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे.   कारखान्यांमुळे मिळालेला तात्पुरता दिलासा कायमस्वरूपी करायचा असेल, तर वाहतूक शिस्तीची कडक अंमलबजावणी आणि बायपाससारखा दीर्घकालीन उपाय हाच कर्जतच्या भविष्यासाठी एकमेव मार्ग आहे.  –  गणेश जेवरे, अध्यक्ष मेन रोड संघटना

लोकसाहित्य देशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते : डॉ. कदम
हरणाची शिकार, जिवंत हरणेही पळवली
कर्जतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात

 वाहतूक शिस्तीसह बायपासचा प्रश्न ऐरणीवर

कर्जत : यंदाच्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा श्वास सोडला आहे. ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस-रात्र धावणारी डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर, तसेच अवजड ट्रक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील सततची कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साखर कारखाने सुरू असताना कर्जत शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून, ऊसाने भरलेली अवजड व लांबलचक वाहने एकापाठोपाठ एक धावत होती. परिणामी शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी, पादचारी यांना मनस्ताप सहन करावा लागे. विशेषतः आठवडे बाजारच्या दिवशी वाहतुकीची स्थिती अक्षरशः ठप्प होत होती. आता गळीत हंगाम संपल्यानंतर ही वाहने बंद झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र, नागरिकांचा हा दिलासा कायमस्वरूपी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी दुचाकी व चारचाकी वाहने अजूनही वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांच्या वेळेत वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला न लावता मधोमध किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केली जात असल्याने कोंडी होते. वास्तविक पाहता या वाहन चालकांना स्वयंशिस्त महत्त्वाची आहे.

यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या मारून त्यातच वाहन उभे करण्याची अंमलबजावणी केली होती. त्यामुळे कोंडीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ही व्यवस्था हळूहळू नामशेष झाली. ही शिस्त पुन्हा लागू करून बेशिस्त वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे.

बायपासशिवाय पर्याय नाही

वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या पाहता कर्जत शहराचा मुख्य रस्ता भविष्यात अपुरा पडणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. केवळ रस्ता रुंदीकरण करून किंवा पार्किंगचे नियम लावून ही समस्या कायमची सुटणार नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरालगतून बायपास काढल्यास अवजड आणि अनावश्यक वाहने शहरात न शिरता बाहेरूनच मार्गक्रमण करतील, तर स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांसाठी मुख्य रस्ता मोकळा राहील. यासाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागासह विधान परिषदेचे सभापती  प्रा. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी  मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे.

 

कारखान्यांमुळे मिळालेला तात्पुरता दिलासा कायमस्वरूपी करायचा असेल, तर वाहतूक शिस्तीची कडक अंमलबजावणी आणि बायपाससारखा दीर्घकालीन उपाय हाच कर्जतच्या भविष्यासाठी एकमेव मार्ग आहे.

 –  गणेश जेवरे, अध्यक्ष मेन रोड संघटना

COMMENTS