Homeताज्या बातम्यासंपादकीय

अन् ते घरी येण्याऐवजी त्यांची बातमी धडकली!

मुंबई हे जगातील असं महानगर आहे की, जिथे स्थिरावणाऱ्या नोकरदार मंडळी-मग ती शासकीय असो अथवा खाजगी-त्यांचे जीवन अगदी चाकोरीबद्ध झालेले आहे. सकाळी उठ

संभाजीराजे भोसले  : छत्रपतींच्या विचारांशी विसंगत वर्तन !
समृध्दीवरची गावे समृद्ध होवोत ! 
हिप्पोक्रॅटस् ते पोर्शे लॅब प्रकरण !

मुंबई हे जगातील असं महानगर आहे की, जिथे स्थिरावणाऱ्या नोकरदार मंडळी-मग ती शासकीय असो अथवा खाजगी-त्यांचे जीवन अगदी चाकोरीबद्ध झालेले आहे. सकाळी उठून नेहमीची आपली कामे आटपून पहाटे किंवा सकाळच्या लोकलने निघून, आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं आणि संध्याकाळ झाली की सुट्टी होऊन पुन्हा एका विहित लोकलने आपल्या घरापर्यंतचा प्रवास करायचा; अशा, चाकोरीबद्ध जीवन भोगाशी आलेल्या मुंबईकरांना चाकरमाने ही संबोधले जाते. पण, हेच चाकरमानी आपल्या  आपल्या जीवनाला डावावर ठेवून, मुंबईच्या अर्थव्यवस्थेत  आपला खारीचा वाटा उचलत असतात. दैनंदिन आयुष्य जगत असतात. काल ही कसाऱ्याच्या दिशेकडून मुंबई सीएसटी कडे प्रवास करणारे चाकरमानी जीवाच्या आकांताने गाडीत कसंतरी शिरायला मिळेल म्हणून, आपापल्या स्टेशनवरून लोकल ट्रेनमध्ये चढले. सकाळी पिक अवर असतो आणि या पिक अवर‌ मध्येच कार्यालयाच्या दिशेने म्हणजे अप दिशेने जाणारी गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कसाबसा तोल सावरत अनेक जण केवळ लोंबकळत प्रवास करत असतात. सीएसटीच्या दिशेकडून लखनऊकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस हीचेही जनरल जनरल डब्बे खचाखच भरलेले.  दोन्ही गाड्या जेव्हा मुंब्रा जवळून क्रॉस झाल्या, तेव्हा त्यातील प्रवासी एखाद्या शेंगदाण्याच्या पोत्यातून शेंगदाणे प्रवासात गळत जावे, त्याप्रमाणे गळाले आणि त्यांच्या जीवनाचा अंत झाला. कुटुंबाचे कर्ते पुरुष आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी मुंबईच्या दिशेने म्हणजे आपल्या कर्तव्याच्या दिशेने जात असताना, घरी त्यांचं कुटुंब संध्याकाळी ते घरी येतील म्हणून आशा धरून होते. परंतु, त्यांनी घर सोडल्यानंतर काहीच वेळ झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या खबरीने त्यांचं कुटुंब अक्षरशः हादरले. दिवा – मुंब्राच्या जवळ  दोन रेल्वेच्या क्रॉसिंग मध्ये झालेला अपघात, अतिशय वेगळ्या प्रकारचा अपघात आहे. मात्र, या अपघाताचे कारण  सांगितलं जात की  दोन रेल्वे मधील बॅगा एकमेकांना लागल्या आणि हे प्रवासी पडले. मुंबईचा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही बाब नेहमीच माहीत असते की, अनेक वेळा गाड्या क्रॉस होतात. परंतु, ते अगदी एखाद्या खडकाला घोरपड चिटकून राहील, तसे हे प्रवासी दरवाजात लोंबकळत असताना प्रवास करतात. परंतु, अतिशय चिवट पद्धतीने ते चिटकून राहतात. त्यामुळे सहजासहजी ते रेल्वेच्या खाली पडत नसतात. परंतु, दिवा-मुंब्राच्या दरम्यान जो नव्याने ट्रॅक निर्माण केला गेला आहे, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ट्रेन ही अक्षरश: एका बाजूने लवण्याचा प्रकार होतो. एका बाजूला झुकते. त्याचवेळी नेमकी समोरून जर ट्रेन आली तर, त्यामध्ये तो जो गॅप आहे तो कमीत कमी झाला आणि एकमेकांना घासले गेले म्हणून प्रवासी अक्षरशः त्या ट्रॅकच्या आजूबाजूने खाली पडले. किमान १२ ते १३ प्रवासी या प्रवासामध्ये खाली पडले. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अर्थात, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं असतं तरी, यातील बरेच प्रवासी हे मृत झालेले आहेत. ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी; परंतु, तितकीच संतापजनक आहे! मुंबईत दर दिवशी लाखोंनी लोंढे येतात. त्यामुळे मुंबईच्या एकूणच साधन संसाधनांवर ताण पडतो. परंतु, किमान अंशी रेल्वेच्या फेऱ्या वाढवून त्यांची प्रवासाची दगदग काही प्रमाणात सुसह्य करता येऊ शकते. गेली कित्येक वर्ष रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. या उलट ज्या मार्गावर गर्दी आहे, त्या मार्गाव्यतिरिक्त दुसऱ्या बाजूला मेट्रो प्रवासाच्या एसी आणि लक्झरीयस सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य मुंबईच्या चाकरमान्यांना ज्या रूटवर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळ आहे, त्या रूटवर रेल्वेची संख्या वाढवून किमान त्यांचा प्रवास काही अंशी सुसह्य करावा. जेणेकरून कालची घटना दिवा-मुंब्रा च्या दरम्यान घडली. अशी दुर्दैवी घटना होणार नाही याची किमान काळजी घेतली जावी. पण त्याचवेळी रेल्वेचा समांतर रूट किती सुरक्षित आहे, ही तंत्रज्ञानात्मक बाब तातडीने विचारात घेणे गरजेचे आहे. कारण, मुंब्रा जवळचा जो ट्रॅक आहे,  त्या ठिकाणी अनेक वेळा गाडी एका बाजूला झुकण्याचा  अनुभव अनेक प्रवाश्यांनी सांगितला आहे.

COMMENTS