Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई / प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय

श्री सिध्दनाथ वज्रलेप सोहळ्यादरम्यान भाविकांना श्रींच्या उत्सव मूर्तींचे दर्शन होणार
प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
हेळवाक येथे घरात घुसलेला बिबट्या जेरबंद

मुंबई / प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाने युध्दकाळातही पारदर्शिकता राखली आहे. सन 1965 मध्ये नेहरू, सन 1971 मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युध्दाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही.
यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा फायदा जरी दाखवला जात असला तरी, पण ब्रिटीश संसदीय पध्दतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. त्यांनी सांगितले, ‘मी स्वतः सन 1996, 1998 आणि 1999 मध्ये तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील.
तसेच पुढे आरोप करताना ते म्हणाले कि, केंद्र सरकार अमेरिका-प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यावर काँग्रेस विरोध करते. यासह त्यांनी ईव्हीएमवर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी पुनः केली आणि म्हणाले, जगभर ईव्हीएम विरोध होत आहे. परंतु केंद्र सरकार अद्यापही इव्हीएम हटविण्याची भूमिका घेत नाही.
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, पीएम मोदींनी मनात आणले तर एका तासात विजय शहा याचे मंत्रीपद काढू शकतात. पण मोदी असे करताना दिसत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मंत्र्यामध्ये आदिवासी वोट बँक दिसत आहे. पण विजय शहा यांनी ऑपेरेशन सिंदूरमधील भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर कोर्टाने ताशेरे ओढले असतानाही या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे.

COMMENTS