बारामती येथे पवार कुटुंबियांचे केले सांत्वन संगमनेर : ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप

बारामती येथे पवार कुटुंबियांचे केले सांत्वन
संगमनेर : ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. त्यांनी बारामती येथे पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला बळकटी दिली. आपल्या रोखठोक स्वभावांमधून राजकारणात आणि समाजकारणात मोठे स्थान निर्माण केले.
प्रशासनावर पकड असलेले अजित दादा हे हजरजबाबी होते. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा आणि आपण मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केले. पटकन निर्णय घेऊन पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय होती. राजकारणात असूनही तोंडावर स्पष्ट बोलणारे दादा हे महाराष्ट्राचे लाडके होते. 28 जानेवारी रोजी झालेला अपघात हा सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होता. विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी त्या खात्याला अधिक गतिमानता दिली. ज्येष्ठ नेते पवार साहेब, सुनेत्रा पवार आणि सर्व पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS