Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभेच्या जागा वाटपासाठी दिल्लीत पुन्हा बैठक

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा
मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध
शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. दिल्लीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. या बैठकीतही जागावाटपावर अंतिम तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. दिल्लीत येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक होईल अशी माहिती आहे. भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ जागा लढवलेल्या होत्या. यावेळी भाजपचा ३२ ते ३५ जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे.

भाजप लोकसभेच्या जागा वाटपात ३२ ते ३५ जागा लढवून मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना मोजक्या जागा सोडण्याची शक्यता आहे. यावरुन जागा वाटपाची चर्चा अडलेय. अमित शाह यांनी शिंदे आणि पवारांना जिंकू शकणाऱ्या जागा देऊ असं म्हटलं होतं. भाजपच्या या भूमिकेमुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेत्यांच्या नाराजीची भीती आणि सोबत आलेल्या काही नेत्यांच्या घरवापसीची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.

COMMENTS