Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’आषाढी’निमित्त टोल वसुली पुढे ढकला

बावनकुळे यांची मंत्री गडकरींकडे मागणी

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझ

२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकु – चंद्रशेखर बावनकुळे
भाजप पुन्हा मविआडीला देणार धक्के ?
बावनकुळे यांच्या जुन्या मतदारसंघात खापा आणि गुमथी दोन्ही ठिकाणी भाजप विजयी 

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा 29 जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी व त्यांची वाहने जाणार असल्याने या विनंतीकडे गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. पंढरपूर जवळील राष्ट्रीय महामार्ग 965 वरील पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे टोल प्लाझा उभारण्यात आला असून त्यावर जून महिन्यापासून टोल वसुली प्रस्तावित आहे. ही टोल वसुली प्रक्रियाच  पुढे ढकलण्याबाबत पत्र श्री गडकरी यांना श्री बावनकुळे यांनी लिहिले आहे. जेणेकरून वारकरी व भाविकांना या राष्ट्रीय महामार्गाचा सुलभतेने वाहतुकीसाठी उपयोग करता येईल. भाविकांना या मार्गावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही व अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

COMMENTS