जालना प्रतिनिधी - औरंगजेबाचे फोटो झळकवणं हा द्वेषद्रोहा पलिकडचा गुन्हा असल्याचं म्हणत फोटो झळकावणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय

जालना प्रतिनिधी – औरंगजेबाचे फोटो झळकवणं हा द्वेषद्रोहा पलिकडचा गुन्हा असल्याचं म्हणत फोटो झळकावणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केली आहे. जनसामान्यांची भावना लक्षात घेवून आमच्या सरकारनं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं आहे. त्यामुळं ज्याने कुणी हे अशा प्रकारचे पोस्टर्स झळकावले त्याचा निषेध करतो आणि हा द्वेषद्रोहापलिकडचा गुन्हा असून त्यांच्यावर कारवाई व्हावी असं दानवेंनी म्हंटले आहे. दरम्यान, तीन राज्यात आम्ही जिंकलो असून निराशेपोटी विरोधी पक्ष तपास यंत्रणेवर खापर फोडत असल्याचेही दानवेंनी म्हंटले आहे.
COMMENTS