Homeताज्या बातम्याकृषी

 कापसाचे दर वाढवण्यात यावे; शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी

वर्धा प्रतिनिधी - आपला देश हा कृषीप्रधान देश असुन यंदा कापसाला भाव नसल्याने  शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत आहे. कापसाचे दर न वाढल्यामुळे काप

वारणा डाव्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी
Superfast Maharashtra : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर (Video)
शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

वर्धा प्रतिनिधी – आपला देश हा कृषीप्रधान देश असुन यंदा कापसाला भाव नसल्याने  शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत आहे. कापसाचे दर न वाढल्यामुळे कापूस घरात भरून आहे. कापसाच्या दरात वाढ होईल या प्रतिक्षेत शेतकऱ्यांनी कापुस घरी भरुन ठेवला आहे. या वर्षा पाऊस जास्त आल्याने कापसाचे पिक खुप कमी प्रमाणात आले. पिक कमी आल्याने कापुस देखील कमी आला. दर ८००० रुपये क्किंटल असल्याने शेतकरी कापुस विक्रीसाठी घाई न करता दर वाढण्याची वाट बघत आहेत. कापसाचे दर वाढवण्यात यावे. अशी प्रशासनाला मागणी करत आहेत. आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बॅंकेतुन कर्ज घेऊन शेतात लागवड केली जाते. पण या सगळ्यावर पाणी फिरले आहे. 

COMMENTS