भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  

Homeताज्या बातम्या

भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला

मुंबई  - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन संजय राऊत यांनी पुन

शिंदे गटात लवकरच स्फोट होईल
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
अजितदादांकडे भाजपच्या कथित घोटाळ्याची फाइल होती?

मुंबई  – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान असताना नेहरूंनीही माफी मागितली होती जेव्हा त्यांच्याकडून शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण झालं होतं. मात्र, भाजपचे हे जे टगे आहेत ते शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत. हे महाराष्ट्र बघतो आहे. महाराष्ट्र संतापला आहे. त्याचा उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

COMMENTS