सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय

मुंबई प्रतिनिधी -  राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून

सरकारवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे – संजय राऊत 
टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)
रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

मुंबई प्रतिनिधी –  राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.  प्रसार माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं. बुलढाणा इथं आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांची जाहीर सभा आहे. येथे आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील, याचीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

COMMENTS