Homeताज्या बातम्या

सातार्‍यात वाहन दंड कमी करण्यासाठी आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : वाहनांवरील कारवाईदरम्यान आकारण्यात येणारा दंड कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र कामगार, कर

श्रीगोंदा शुगर या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून तिरंग्याचा अवमान ; कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार

सातारा / प्रतिनिधी : वाहनांवरील कारवाईदरम्यान आकारण्यात येणारा दंड कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघाच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांनी आंदोलन केले.
याबाबतचे निवेदन आंदोलक रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. राज्य शासनाने वाहतूक नियम मोडणार्‍यांवर केलेल्या कारवाईदरम्यान आकारण्यात येणार्‍या दंडामध्ये प्रचंड वाढ केली आहे. ही वाढ सर्वसामान्य जनतेची तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे कंबरडे मोडणारी आहे. कोरोना काळात अनेकांच्या हाताचे रोजगार हिरावले गेले असून, त्यांना दररोज हातातोंडाची गाठ घालताना कसरत करावी लागत आहे.
सद्य:स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून, त्याला तोंड देत सर्वसामान्य प्रवाशांची ने-आण करण्याचे काम खासगी वाहतूकदार, रिक्षाचालक करत आहेत. या वाहनांवरील दंडातही प्रचंड वाढ केली असून, एखाद्यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान त्यास इतका दंड भरणे शक्य होणार नाही. शासनाने सर्वसामान्यांचा विचार सहानुभूतीपूर्वक करत केलेली दंड वाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर चंद्रकांत खंडाईत, बाळकृष्ण देसाई, शशिकांत खरात व इतर रिक्षा व्यावसायिकांच्या सह्या आहेत.

COMMENTS