बारामतीच्या ४४ गावांमध्ये शेती, पिण्यासाठी पाणी नाही… दिशाभूल करू नका…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीच्या ४४ गावांमध्ये शेती, पिण्यासाठी पाणी नाही… दिशाभूल करू नका…

प्रतिनिधी : पुणेभाजप आमदार गोपीचंद पडळकर हे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारां

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेले मोडी अप्रकाशित पत्र उजेडात
अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
संजीवनीच्या विद्यार्थ्यांची लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट

प्रतिनिधी : पुणे
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहे.

आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला . जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे झालेल्या सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते.

आपण शरद पवार यांच्यावर वारंवार का निशाणा साधतो . या मागील कारण त्यांनी सभेत स्पष्ट केले .राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सतत आपल्या कामाच्या स्तुती करण्यात येते . आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत .

मात्र ज्या बारामती विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवून ते निवडून आले आहेत . त्या मतदार संघातल्या 44 गावात शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, असे म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादीला धारेवर धरले .

अशाच प्रकारची अवस्था जुन्नरमधील आहे . ज्या तालुक्यात 5 धरणे आहेत त्या तालुक्यातील जनतेला आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे . याच्यापेक्षा मोठं पाप या पवार कुटुंबियांचे कोणतच असू शकत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो, असे पडळकर म्हणाले .

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वसामन्य जनतेची दिशाभूल करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही या, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे .

भाजप ही तरूणांसाठी काम करते, राष्ट्रहितासाठी काम करते. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कोणत्याची नेत्याचा पक्ष नाही , असेही ते म्हणाले .

COMMENTS