Homeताज्या बातम्यादेश

मणिपूर हिंसाचारानंतर मोठ्या कारवाईची तयारी

इम्फाळ ः मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यात आलेल्या अपयशानंतर आता केंद्र सरकार ठोस पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कारण हिंसाचार नियंत्रणात आणण्या

उमेश खून प्रकरणातील आरोपीचे एन्काउंटर
शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या
नाट्य स्पर्धेत ईशान कोयटेची यशस्वी कामगिरी

इम्फाळ ः मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यात आलेल्या अपयशानंतर आता केंद्र सरकार ठोस पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कारण हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी आणि हिंसक घटनांना जबाबदार समुहांना धडा शिकवण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार दिवसांत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे शेकडो जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाचे जवान अनेक आधुनिक गाड्यांसह गस्त घालताना दिसत आहेत. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था यापूर्वी कधीही दिसली नाही. जिरीबाममध्ये यावर्षी 6 जूनपासून हिंसा भडकली होती. त्यामुळे मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS