Homeताज्या बातम्यादेश

कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

तिरुपती बालाजीहून परतताना अपघात

हैदराबाद/वृत्तसंस्था ः आंध्रप्रदेशमध्ये तिरूपती बालाजीचे दर्शन घेवून परतत असतांना ट्रकने कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात
भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी
कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

हैदराबाद/वृत्तसंस्था ः आंध्रप्रदेशमध्ये तिरूपती बालाजीचे दर्शन घेवून परतत असतांना ट्रकने कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  आंध्रप्रदेशच्या अन्नामाया जिल्ह्यात ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 11 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथे शुक्रवारी सकाळी जीप आणि लॉरीमध्ये जोरदार धडक झाली, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेवून 16 भाविक क्रुझर गाडीने घरी परतत होते. गाडीला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातातील मृतांपैकी चारजण बेळगाव जिल्ह्याच्या बडची गावातील एकाच कुंटुबातील आहेत. तर पाचव्या मृताचा पत्ता शोधण्याचे काम सुरु आहे हनुमंता आजुर (वय 52), महानंदा आजुर (वय 46), शोभा आजुर (वय 36), अंबीका आजुर (वय 19 चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), मनमंथ जाधव (वय 52) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या 11 जणांपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

COMMENTS