सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

भाळवणी (प्रतिनिधी) :-  कोविडचा प्रादुर्भाव पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सतत वाढत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने भाळवणीसह तालुक्यातील बारा

कोतुळ पूल गेला पाण्याखाली ! l पहा LokNews24 —————
शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा
गुरूपौर्णिमेनिमित्त देवगडमध्ये उसळली भाविकांची गर्दी

भाळवणी (प्रतिनिधी) :- 

कोविडचा प्रादुर्भाव पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सतत वाढत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने भाळवणीसह तालुक्यातील बारा गावांमध्ये सलग चौदा दिवस लाॅकडाउन जाहिर केल्याने चौदा दिवसांपासून संपुर्ण बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले असून 

तीन तारखेपर्यंत बंदचे आदेश असताना चार तारखेला दुकाने उघडण्याची तयारी सर्वजण करत असताना पुन्हा दहा दिवसांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील भाळवणीसह सहा गावे बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असताना या सर्वच गावांमधील व्यवहार ठप्प झाले असून  सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या लॉकडाउनच्या कालावधीत लहान – मोठे सर्वच व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

या बंदला सर्वजण कंटाळले असून हे लॉकडाउन प्रशासनाने शिथिल न केल्यास व्यापारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. तशा चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरु आहेत.

COMMENTS