रैनिसांस स्टेट पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रैनिसांस स्टेट पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी गिरीश कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या 'रैनिसांस स्टेट - द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग महाराष्ट्र' या पुस्तकावर बंदी घालावी.

राज्यात या ऑक्टोबरला वाजणार ‘शाळेची घंटा’
अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?
दीपाली चव्हाणच्या गर्भपातप्रकरणी शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा

पुणे : छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी गिरीश कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या ‘रैनिसांस स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घालावी. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. गिरीश कुबेर यांनी ‘रैनिसांस स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री सोयराबाई यांचा खून केला असे लिहिले आहे. तसेच शाहू महाराजांना दुरदृष्टीचा अभाव असणारे व कृर्तृत्व नसणारे छत्रपती होते. महादजी शिंदें तर विश्वासघातकी, दगाबाज होते. अशा पध्दतीचे आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांचेवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

गिरीश कुबेर यांनी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करुन जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे. तसेच, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते त्यामुळे या पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत. गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड डांगे चौक, थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

COMMENTS