राज्यात कडक टाळेबंदीचे सूचोवाच ; मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात कडक टाळेबंदीचे सूचोवाच ; मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार

राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे; मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही.

शीतल वाली यांनी स्वीकारला वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे निधन
अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे

 मुंबई/प्रतिनिधीः राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे; मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी लावण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात किराणा दुकाने चार तासच उघडी ठेवण्यात येणार आहेत. 

दिल्लीत सहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आपण टाळेबंदी केलेली नाही. अनेक व्यापार्‍यांचा टाळेबंदीला विरोध होता; पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसेच इतर लहान दुकाने असणारेही टाळेबंदी शंभर टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक टाळेबंदीसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करून तो निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होते, लाट सौम्य येईल; पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, असे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या टाळेबंदीची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी या वेळी कोरोनाच्या लढाईसाठी ठाकरे सरकारने साडेपाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी 1200 कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी तीन एप्रिलला पैसे आले होते; पण या वर्षी अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून 1600 कोटी अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

शाह यांनी ठाकरेंवर ढकलली जबाबदारी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनासंबंधीचा प्रश्‍न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी देशात टाळेबंदी लागू करणार नसल्याचे सांगताना महाराष्ट्राची परिस्थिती मुख्यमंत्री हाताळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असल्याचे सांगून चेंडू ठाकरे यांच्या कोर्टात टोलावला.

COMMENTS