प्रतिकात्मक वारीला नऊ संघटनांचा विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतिकात्मक वारीला नऊ संघटनांचा विरोध

या वर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

एक्स’चा भारतीय यूजर्सना दणका
घरगुती वादाकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने घेतले स्वतःला पेटवून | LOK News 24
दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’; अवघ्या ६०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

अकोला/प्रतिनिधी : या वर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत; मात्र सरकारच्या या निर्णयाला राज्यातील वारकर्‍यांच्या नऊ संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या संघटनांनी सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करायला 24 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. 

सरकारने ज्ञानोबा-तुकाराम महाराजांच्या पालख्यांना 50 लोकांसह पायी दिंडीची परवानगी दिल्यास आंदोलनावर फेरविचार करणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे. यानंतर सरकारने सकारात्मक ठोस निर्णय न घेतल्यास या संघटना तीन जुलैला आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी काढणार आहेत. या नऊ संघटनांचे प्रत्येकी दहाजण जत्थ्याने सहभागी होणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे वारकरी संघटनांनी ’माझी वारी, माझी जबाबदारी’ हा नारा दिला आहे. या वारीत वारकरी स्वत:हून कोरोना नियमांचे पालन करणार असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारकडून एकीकडे हा प्रश्‍न निकाली निघाल्याची चर्चा आहे; मात्र या वारकरी संघटनांच्या या नव्या पवित्र्याने सरकार-वारकरी संघर्ष उभा राहण्याची नाकारता येत नाही. पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्राचा प्राचीन सांस्कृतिक ठेवा आणि परंपरा आहे; मात्र मागच्या वर्षापासून कोरोनामुळे या वार्षिक आनंद सोहळ्यावर विरजण पडले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीही पंढरपूरची आषाढी वारी ही प्रतिकात्मक स्वरूपातच होणार आहे. सरकार आणि काही वारकरी संघटनांमध्ये नुकतीच यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत या वर्षीही वारी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्याचं ठरवले. यानंतर या निर्णयानुसार मानाच्या पालख्या आणि पादुका बसने वाखरीपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत; मात्र आता या निर्णयाविरोधात नऊ वारकरी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या नऊ वारकरी संघटनांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घेत पायी वारीचे आयोजन केले आहे.

’माझा वारी, माझी जबाबदारी!’

’माझी वारी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून या वारकरी संघटना एकत्र आल्या आहेत. सरकारला ’ज्ञानोबा-तुकोबा’चा पालखी सोहळा पायी केला जावा, असा आग्रह या संघटनांनी केला होता; मात्र कोरोना परिस्थितीमुळे वारकरी संघटनांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकार पायी वारीविषयी गंभीर नसल्याचा आरोप करीत या नऊ वारकरी संघटनांनी एकत्र येत महाक्षेत्र आळंदी ते महाक्षेत्र पंढरपूर अशी पायदळ वारी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे ठरविले आहे.

COMMENTS