पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,

अतिवृष्टी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिकासाठी हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार नुकसानभरपाई देण्यात यावी

महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण
नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण

अहमदनगर/प्रतिनिधी- अतिवृष्टी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिकासाठी हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे  व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नगर जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावात  अतिवृष्टी व गारपीट झाली असून, यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच यापूर्वीचा कोरडा दुष्काळ व मागील वर्षीची अतिवृष्टी यातून शेतकरी कुठे सावरत असताना तसेच श्रम आणि पैसा पणाला लावून शेतकर्‍यांनी पीक जोमात आणले असताना गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये गहू, हरभरा, कांदे, मका, ऊस, टरबूज, खरबूज तसेच आंबा, संत्री, द्राक्षे, मोसंबी, चिंच या फळबागांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना या आर्थिक हानीतून सावरण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे, असे या निवेदनात स्पष्ट केले गेले आहे. मागील वर्षीच्या गारपिटीची नुकसान भरपाई अद्याप शेतकर्‍यांना मिळाली नसल्याने तीही नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अतिवृष्टी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, प्रसाद ढोकरीकर, कचरू चोथे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, रभाजी सूळ, आजिनाथ हजारे, शामराव पिंपळे आदी उपस्थित होते. येत्या आठ दिवसात शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर भाजपच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी सांगितले.

कोट

नगर जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंच्या पिकांचे व फळबागांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला यांचे नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 25 हजार रुपये तर फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट अनुदान शासनाने द्यावे. जेणेकरून शेतकर्‍यांना या अडचणीतून सावरण्यास मदत होईल.

अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष, भाजप

कोट

राज्यात अवकाळी पाऊस होऊन तीन-चार दिवस झाले तरी सरकारने पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश दिले नाही. सरकारचे सर्व लक्ष संजय राठोड, अनिल देशमुख, सचिन वाजे या प्रकरणांच्या माध्यमातून थेट दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत बैठकाचे सत्र सुरु आहे, पण शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला सरकारला अजिबात वेळ नाही.

शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार, राहुरी मतदार संघ

COMMENTS