देवाला कोंडण्याचे पाप सरकार करीत आहे ; भाजपचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवाला कोंडण्याचे पाप सरकार करीत आहे ; भाजपचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी- जो देव मनुष्यावर संकट आल्यावर धावून येतो, त्याच देवाला कोंडून ठेवण्याचे पाप राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोरोनाची दुसरी

वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला अटक करण्यात राहुरी पोलीसांना अपयश
संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 272 मतदान केंद्र

अहमदनगर/प्रतिनिधी- जो देव मनुष्यावर संकट आल्यावर धावून येतो, त्याच देवाला कोंडून ठेवण्याचे पाप राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरून आता सर्वत्र पूर्ववत परिस्थिती होत असताना मंदिरे बंद ठेवून शासन भाविकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे. मंदिरासारख्या पवित्र व प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देणारी ही शक्तीस्थळे बंद ठेवून सरकार काय सिद्ध करत आहे?, असा सवाल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी सोमवारी येथे केला.
शहर जिल्हा भाजपच्यावतीने राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिरासमोर आरती करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांच्यासह ज्येष्ठ नेेते अ‍ॅड.अभय आगरकर, सुनील रामदासी, वसंत लोढा, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अंजली देवकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकाराने गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच मंदिर उघडण्यावर बंदी घातली होती. परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असताना जवळजवळ सर्वच क्षेत्रावरील निर्बंध उठवून सर्व व्यवस्थितरित्या सुरु केले. विशेषत: बारही सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र, मंदिरे बंद ठेवली आहेत, अशी टीका करून गंधे म्हणाले, सरकार आपले अपयश झाकण्यासाठी मंदिर उघडण्याचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत आहे. पण, ही मंदिरे लवकरात लवकर न उघडल्यास भाजपच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा गंधे यांनी दिला.
यावेळी अ‍ॅड. आगरकर म्हणाले, मंदिरे आपली प्रेरणा आणि शक्तीस्थाने आहेत. देवादिकांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख व सुमृद्ध होत असते. ही प्रेरणास्थाने बंद ठेवून सरकार भाविकांना एकप्रकारे वेठीस धरत आहेत. मंदिरातून कोरोना होतो व इतर ठिकाणाहून होत नाही का? राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी कारभार असून, त्यामुळे धार्मिक भावनांबरोबर मंदिरावर अवलंबून असणार्‍या अनेक घटकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याचा निर्णय होईपर्यंत आंदोलने केली जातील, असे त्यांनी सांगितले. लोढा म्हणाले, सर्वत्र जीवनमान सुरु झाल्याने आता मंदिरे उघडण्यास काही हरकत नसताना राज्य सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे. देवदर्शनाने सर्वांची दु:खे नाहिशी होतात, सात्विक विचार मिळतात, ती मंदिरे बंद ठेवून सरकारला काय सध्या करायचे, हेच कळत नाही. याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलने करत असून, या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे, असे सांगून हे आंदोलन यापुढेही सुरु राहील, असे सांगितले.
यावेळी सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, महेश तवले, उमेश साठे, अमित गटणे, किशोर बोरा, ज्ञानेश्‍वर काळे, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, वसंत राठोड, गणेश साठे, पंकज जहागीरदार, आशिष अनेचा, डॉ.ज्ञानेश्‍वर दराडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, बाळासाहेब खताडे, किशोर कटोरे, संदीप मुनोत आदी उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाच्या मंदिर बंद ठेवण्याच्या भूमिकेचा आसूड मारुन तसेच शंखनाद व घंटानाद करुन निषेध करण्यात आला.

COMMENTS