केंद्राच्या सहकार खात्यामुळे राज्यावर गंडातर नाही : शरद पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राच्या सहकार खात्यामुळे राज्यावर गंडातर नाही : शरद पवार

बारामती : केंद्र सरकारने सहकार खात्याची स्थापना केली असून, याचा पदभार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सहकार खात्याच्य

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ
ओबीसी आरक्षणात सरकार आणणारेच झारीतील शुक्राचार्य ; माजी मंत्री बावनकुळे यांची शरद पवारांचे नाव न घेता टीका
‘सोळा हजारात देखणी’… ‘ही’ लावणी सम्राज्ञी करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

बारामती : केंद्र सरकारने सहकार खात्याची स्थापना केली असून, याचा पदभार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण करू पाहत असल्याची टीका होत आहे. मात्र केंद्राच्या सहकार खात्यामुळे राज्यावर गंडातर येण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले की, सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केलेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मल्टीस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत, त्यामुळे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. गेली दहा वर्षे आपण कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता आणि आताही आहेत, असे पवार म्हणाले. दरम्यान समान नागरी कायद्यासंदर्भात बोलताना त्यांनी केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही असं म्हटलं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे असं यावेळी ते म्हणाले. भास्कर जाधव यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा तीन पक्षाचा निर्णय स्पष्ट झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं ते म्हणाले. समान नागरी कायद्यासंदर्भात ते म्हणाले की, केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार काय करतय यावर आमचे लक्ष आहे.

आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष नाही
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहे. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष नाही. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे काँगे्रसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली, तरी ती त्यांची भूमिका आहे, यात चुकीचे काही नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS