कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ६० हजार ग्राहकांना नोटिस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ६० हजार ग्राहकांना नोटिस

महालोकअदालतीच्या माध्यमातून तडजोड करण्याचे महावितरणचे आवाहन

नाशिक: कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या  महावितरणच्या नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर  मंडळातील  अशा एकूण ६० हजार १३३  ग्राहकांना जिल्हा व तालुका  व

पुणे येथील मासा क्लब संघ प्रथम विजयाचा मानकरी
उस्माननगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक ठिकाणी अभिवादन
पारनेरमध्ये १ कोटी २१ लाखचा विदेशी मद्याचा साठा जप्त

नाशिक: कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या  महावितरणच्या नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर  मंडळातील  अशा एकूण ६० हजार १३३  ग्राहकांना जिल्हा व तालुका  विधी सेवा प्राधिकरण यांचे माध्यमातून नोटीस देण्यात आल्या असून  आज शनिवार ७ मे २०२२  रोजी   नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये होणाऱ्या  राष्ट्रीय महालोकअदालत मध्ये तडजोडीच्या  माध्यमातून व  विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे  आवाहन महावितरणने केले आहे.  थकबाकीमुळे  कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसोबतच ग्राहकांना लाभ व सवलत मिळेल या हेतूने विलासराव देशमुख अभय  योजना जाहीर केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत  थकबाकी असणाऱ्या व त्यामुळे  कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित  ग्राहकांकडील  थकबाकीचा भरणा करून  सवलतीसोबतच पुनर्रजोडणीची संधी मिळणार आहे. या योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची  मूळ रक्कम भरावी  लागेल, त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील  व्याज व विलंब आकार १००% माफ करण्यात येइल. जर थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५% व लघुदाब ग्राहकांना १०% थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून तसेच या योजनेचा लाभ संबंधित ग्राहकांनी घेऊन थकबाकीमुक्त व्हावे  असे आवाहन महावितरणने केले आहे. 

COMMENTS