राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत.
मुंबई / प्रतिनिधी: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत. अनेक जण मुखपट्टी गळ्याशी लावूनच असतात; पण तोंड आणि नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने मुखपट्टी घालत नाही. मुखपट्टी न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो.
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांच्या मनातली कोरोनाची भीती दूर झालेली. त्यामुळे बरेच जण मुखपट्टी घालायला टाळाटाळ करत आहेत. मुखपट्टी न घालण्याचा बेफिकीरीपणा एका-दुसऱ्याच्या नाही, तर तब्बल चारशे जणांच्या जिवावर बेतू शकतो. संख्येवर न जाता लोकांनी मुखपट्टी वापरली पाहिजे.
COMMENTS