Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील वारकर्‍यांना मिळणार पेन्शन

पायी वारी करणार्‍यांसाठी राज्य सरकारची घोषणा

मुंबई ः आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर असतांना सोमवारी राज्य सरकारकडून वारकर्‍यांना आनंदांची घोषणा करण्यात आली आहे. कीर्तनकार आणि वारकर्‍यांना

‘कुटासा इको टुरिझम’च्या प्रस्तावाला गती द्या ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
जिल्हा परिषदेच्या समुद्रात निंबाळकरांनी वेगळेपण जोपासले-जिल्हाधिकारी

मुंबई ः आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर असतांना सोमवारी राज्य सरकारकडून वारकर्‍यांना आनंदांची घोषणा करण्यात आली आहे. कीर्तनकार आणि वारकर्‍यांना सोयी सुविधा पुरवण्याकरीता मुख्यमंत्री वारककरी महामंडळ स्थापन करण्याचा महत्वपूर्ण राज्य सरकारने घेतला. यासोबतच पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, वाकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र कालानुरूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामंडळाकडून तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकर्‍यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत,  विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्‍न सोडवणे सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे.  पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्‍वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्‍वर, भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

वारकरी महामंडळाच्या प्रस्तावित योजना – या महामंडळाकडून परंपरेने महिन्याची पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदयाच्या अडीअडचणी, प्रश्‍न सोडवणे, सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा, सुविधांसाठी आर्थिक तरतूद करणे, आषाढी-कार्तिकी वारीसाठी येणार्‍या वारकर्‍यांना सुरक्षा, विमा कवच, वारकरी भजनी मंडळाला भजन-कीर्तन साहित्याकरिता अनुदान, कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबवणार आहेत. आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देणार,  पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्‍वरचा विकास करणे आदी बाबींचा समावेश आहे.

वारकर्‍यांना आरोग्य विमा कवचही मिळणार – वारकरी मंडळाच्या मुख्यालयात प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकार्‍यांची महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासोबतच या महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतके असणार आहे. यासोबतच कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिले जाणार आहे, असे या शासन निर्णयात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनांबद्दल घोषणा करण्यात आली होती. आता आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून याबद्दलच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS