Homeताज्या बातम्यादेश

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसा; गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

मणिपूर प्रतिनिधी - मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरा पासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तो

२२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा यासाठी गर्भवती मातांचे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अर्ज
खुनातील आरोपी अटक टाळण्यासाठी रुग्णालयात
भारताचे शुक्रयान 2028 मध्ये होणार लाँच

मणिपूर प्रतिनिधी – मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरा पासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री एका गावात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला आहे. यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० अन्य नागरिक जखमी झाले आहेत. सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे. पहाटे १ वाजता हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या सर्वांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी देखील या भागात गोळीबार झाला होता. यामध्ये नऊ लोक जखमी झाले होते. फुटीरतावादी आणि ग्रामीणांमध्ये सोमवारी रात्री उशिरा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजुचे नऊजण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

COMMENTS