मुंबई : महायुतीची मुंबईत होणारी बैठक टाळून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्यातील आपल्या मूळ गावी जाणे पसंद केले. त्यामुळे महायुतीम

मुंबई : महायुतीची मुंबईत होणारी बैठक टाळून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्यातील आपल्या मूळ गावी जाणे पसंद केले. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांनंतरही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार निवडण्यात आलेला नाही, त्यातच भाजपचा गटनेता देखील निवडण्यात न आल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे दिसून येत आहे.शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे अद्याप सरकार स्थापन करता आले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच राज्यातील भाजप नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
COMMENTS