Homeताज्या बातम्यादेश

जातनिहाय जनगणनेला अटींसह संघाचा पाठिंबा

तीन दिवसीय बैठकीत संघाने केली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली ः देशामध्ये जातनिहाय जनगणनेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चिला जात असून, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे केरळमध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय बैठकीत ज

अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार
राहुरीत 2 जूनला अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव सोहळा
निर्दयी आईने बाळाला दिले उकिरड्यावर फेकून… महिलेच्या सतर्कतेने वाचला जीव (Video)

नवी दिल्ली ः देशामध्ये जातनिहाय जनगणनेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चिला जात असून, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे केरळमध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय बैठकीत जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट केली आहे. जातनिहा जनगणनेचा उपयोग हा लोककल्याणासाठी व्हावा, कारण जात हा समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. तसेच हा देशाच्या एकतेशी निगडित प्रश्‍न आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर न ठेवता याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भूमिका संघाने व्यक्त केली अहो. केरळमधील पलक्कड येथे संघाचे तीन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत संघाने जातीय जनगणनेला पाठिंबा दर्शवला असला तरी काही अटीही घातल्या आहेत. संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यावर भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, लोककल्याणासाठी ते उपयुक्त आहे, परंतु त्याचा वापर निवडणुकीसाठी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय जनगणनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी नव्याने पाऊले उचलण्याचा सल्ला दिला आहे. आंबेकर पुढे म्हणाले की, दोन्ही विषयांवर आरएसएसची एक बैठक झाली. यावेळच्या चर्चेत अनेक विषय घेण्यात आले तसेच भविष्याबाबतही काही निर्णय घेण्यात आले आहेत. जातीय जनगणनेमुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, अशी भूमिका संघाने मांडली आहे. यामुळे यापासून वाचण्यासाठी जनस्तरावर एकोपा वाढवण्यासाठी काम केले जाईल, असे ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सहा सहसरचिटणीसांच्या उपस्थितीत तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक शनिवारी सुरू झाली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटनेचे सरचिटणीस (संघटना) बीएल संतोष, विहिंपप्रमुख आलोक कुमार आणि भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरणमय पांड्या यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित 32 संघटनांचे राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित होते.

जातनिहाय जनगणनेचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा – जात हा आपल्या समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. हा देखील देशाच्या एकतेशी निगडित प्रश्‍न आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर न ठेवता याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सरकारला आकडेवारी हवी आहे. समाजातील विशिष्ट जातींच्या लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी (जातीय जनगणना) करण्यात यावी. जातीय जनगणनेचा उपयोग लोककल्याणासाठी व्हायला हवा असे मत, संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS