Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

26 जून रोजी होणार निवडणूक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार सत्तेत आले असून, भाजप एकाहाती सत्ता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भाजपला चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुम

करकंब पोलीस ठाण्याच्या इमारतीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
रेल्वे रुळावर थांबलेल्या ट्रकला रेल्वेची धडक… ट्रकचा झाला चकनाचूर… पहा थरारक व्हिडीओ
प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार सत्तेत आले असून, भाजप एकाहाती सत्ता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भाजपला चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यामुळे लोकसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. मात्र या पदासाठी भाजप यांच्यासह मित्रपक्षांकडून मोठी रस्सीखेच होतांना दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन 24 पासून सुरू होत आहे. आठ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिनेशनाच्या तिसर्‍या दिवशी 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. याबाबत लोकसभेद्वारे बुलेटिन जारी करत माहिती देण्यात आली आहे. या बुलेटिनमध्ये लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.संसदेचे अधिवेशन बुधवारी, 3 जुलै रोजी संपणार आहे. लोकसभेतील सर्व निवडून आलेले खासदार या संसदेच्या अधिवेशनात शपथ घेतील. नव्या सभापतींच्या नियुक्तीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणात पुढील पाच वर्षांच्या सरकारच्या संभाव्य रोडमॅपवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सहसा नवीन खासदारांच्या पहिल्या बैठकीत केली जाते. जोपर्यंत नवीन सभापती निवडला जात नाही, तोपर्यंत बहुधा सर्वाधिक अनुभव असलेल्या खासदाराची सभागृहाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली जाते. हंगामी अध्यक्ष लोकसभेच्या पहिल्या काही अधिवेशनांचे अध्यक्षपद भूषवतात आणि नवीन अध्यक्ष आणि उपसभापतींसाठी मतदान घेतात. लोकसभा अध्यक्षपदासाठी अद्याप सरकारने कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, विरोधी पक्षाने एनडीएतील मित्रपक्ष जेडीयू आणि टीडीपीला आवाहन केले आहे की, त्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी जोर लावावा. त्यांनी आपले उमेदवार उभे करावेत.

COMMENTS