पाथर्डी : भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या शौर्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने शहरात
पाथर्डी : भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या शौर्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने शहरात रविवारी भाजपा अहिल्यानगर (दक्षिण) व भाजपा पाथर्डी पूर्व व पश्चिम मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा यात्रेत माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राहुल राजळे, अभय आव्हाड, सुभाष बर्डे, अशोक चोरमले, धनंजय बडे, दिगंबर भवार, उद्धव वाघ, विष्णुपंत अकोलकर,, संदीप पठाडे, बंडूशेठ बोरुडे, नारायण पालवे, बजरंग घोडके,अजय भंडारी,अमोल गर्जे,प्रशांत शेळके,प्रसाद आव्हाड,प्रतीक खेडकर, मुकुंद गर्जे,रणजीत बेळगे, राहुल कारखेले, मनिषा घुले, मंगल कोकाटे,बाळासाहेब महाडिक, शिवाजी खेडकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके, सुभाष गायकवाड, ॲड. विवेक नाईक, राहुल शिंदे, डॉ. विक्रम भोसले, सुभाष दुधाडे, मनोज ठोकळ, महेश वाघ, गणेश भालसिंग, विद्या शिंदे, शिला खराडे, महेश लांडगे, सचिन कुसळकर, अजित काकडे, दत्तु पवार, शिवा खिलारी, दादा दरेकर यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेचा प्रारंभ वीर सावरकर मैदान (बाजरतळ) येथून माजी सैनिकांच्या सन्मानाने आणि फुगे आकाशात सोडून करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, ही तिरंगा यात्रा देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला पाठिंबा देणारी असून देशप्रेम आणि एकतेचे दर्शन घडवणारी आहे.ही यात्रा केवळ पायदळ यात्रा नसून देशभक्ती आणि सैन्याबद्दलच्या निष्ठेचे प्रतीक असल्याचे शेवटी म्हणाले.
समारोपप्रसंगी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले असून त्यांच्या पराक्रमाचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे. या तिरंगा यात्रेद्वारे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
या यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीतांचा गजर, “हम सेना के साथ हैं”, “ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. शहीद जवानांच्या स्मारकाला आणि थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी तिरंगा यात्रेवर फुलांची उधळण केली आणि मिठाई तसेच पाण्याचे वाटप करून स्वागत केले.
या यात्रेत आजी-माजी सैनिक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, महिलासंघटना, युवक-युवती, तसेच तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तिरंगा यात्रा देशभक्तीच्या भावनेने भारलेली असून एकतेचे दर्शन घडवणारी ठरली. अजंठा चौकात राष्ट्रगीत गायन करून यात्रेचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राजीव सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी मानले.
COMMENTS