पुणे प्रतिनिधी - राज्याचा गाडा प्रशासन हाकत असून, मंत्र्यांचे अर्धे काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे काम करत असतील तर, ज्ञानेश्वरा

पुणे प्रतिनिधी – राज्याचा गाडा प्रशासन हाकत असून, मंत्र्यांचे अर्धे काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे काम करत असतील तर, ज्ञानेश्वरासारखे रेडयाच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते म्हणजे रेडयांचीच औलाद आहे, कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय बोलत नाही, असे वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यात स्पर्धा परीक्षासंबंधित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सदाभाऊ खोत यांनी विशेष सूचनाही केल्या. पुण्यात स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्याची संख्या लाखोंच्या घरात आहे. तेव्हा राज्यकर्त्यांसमोर आपल्या मागण्या मांडण्याचे व्यासपीठ म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले पाहिजे, अशी विशेष सूचना सदाभाऊ खोत यांनी केली. पुढे बोलता-बोलता त्यांनी राज्यकर्ते रेड्यांची अवलाद असते, असे विधान केले. सदाभाऊ खोत म्हणाले, वरच्या सभागृहामध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि मी स्वत: तसेच खालच्या सभागृहामध्ये आ. बच्चू कडू, आ. अभिमन्यू पवार यांनी स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम उचलून धरले. बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी लावून धरला होता. आम्ही सगळे नेते तुमच्या बरोबर आहोत, याचे कारण म्हणजे तुम्ही सगळी मुले गावखेड्यातील आहे, गावगाड्यातील आहेत. तुमचे आईबाप शेता-मातीत राबून तुम्हाला इकडे पैसे पाठवत असतात आणि तुम्हीही रात्रीचा दिवस करुन मेहनत घेत असतात. तुम्हाला विशेष सूचना आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय अधिवेशन घ्या. कारण राज्यकर्त्यांना ’डोक्यांची’ (मतदार) भीती असते, असे देखील यावेळी खोत म्हणाले.
COMMENTS