Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईचा महापौर शिवसैनिकच व्हावा ः शिंदें

कोणताही निर्णय जनादेशाच्या विरोधात घेणार नसल्याचे केले स्पष्टमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महापौरपदावर शिवसेनेचा दावा अधिक तीव्र हो

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत ; ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात?

कोणताही निर्णय जनादेशाच्या विरोधात घेणार नसल्याचे केले स्पष्ट
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महापौरपदावर शिवसेनेचा दावा अधिक तीव्र होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, शिवसैनिकांच्या भावना आणि पक्षाची परंपरा अधोरेखित केली. 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या पार्श्‍वभूमीवर बीएमसीमध्ये शिवसेनेचाच महापौर असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणताही निर्णय जनादेशाच्या विरोधात घेतला जाणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. बीएमसीची निवडणूक शिवसेना-भाजप युतीत लढवण्यात आली होती, त्यामुळे ज्या महापालिकांमध्ये युतीने निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. बीएमसीच्या 227 जागांपैकी भाजपला 89 तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. महापौरपदासाठी 114 नगरसेवकांचे बहुमत आवश्यक असून, भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाच्या किमान 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. निकालानंतर शिवसेनेचे सर्व 29 नगरसेवक वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. पक्षाकडून याचे स्पष्टीकरण देताना, ही ‘ओरिएंटेशन कार्यशाळा’ असून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती नगरसेवकांना देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, 18 जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व नगरसेवकांची भेट घेतली. 29 महानगरपालिकांतील महापौरपदासाठी 22 जानेवारी रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. पद खुल्या प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय किंवा महिलांसाठी आरक्षित आहे का, हे यावेळी निश्‍चित होईल. त्यानंतर अधिसूचना जारी केली जाईल. सात दिवसांची अनिवार्य नोटीस असल्याने महापौर निवडणूक 29 किंवा 30 जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 जानेवारी रोजी स्वित्झर्लंडहून परतणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटापाठोपाठ भाजपही आपल्या नगरसेवकांना ‘सुरक्षित ठिकाणी’ हलवण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. नेमकं कोण कोणाला घाबरत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मात्र ठामपणे सांगितले की, मुंबईचा पुढील महापौर महायुतीमधूनच असेल आणि ठाकरे गटाचा महापौर होण्याची कोणतीही शक्यता नाही. दुसरीकडे, ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी भाजप आणि शिंदे गटावर सत्तालोलुपतेचा आरोप करत, त्यांच्या अंतर्गत संघर्षात उद्धव गटाला ओढू नये, असे सांगितले. याच पार्श्‍वभूमीवर नगरसेवक फोडाफोडी आणि पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, बीएमसीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, पक्षाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करणार्‍या नेत्याला हायकमांडकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

विरोधकांची संख्या बहुमतापेक्षा 8 ने कमी
निवडणुकीत शिवसेना (यूबीटी) 65 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर राहिली आहे. मनसेला 6, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला 1, काँग्रेसला 24, एआयएमआयएमला 8 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी त्यांची संख्या 106 वरच पोहोचते, जी बहुमतापेक्षा 8 ने कमी आहे.

COMMENTS