मुंबई ः राज्यात मुंबई पाठोपाठ इतर शहरांनी प्रदूषणाने विळखा घातल्यामुळे राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. एकीकडे थंडीची च

मुंबई ः राज्यात मुंबई पाठोपाठ इतर शहरांनी प्रदूषणाने विळखा घातल्यामुळे राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. एकीकडे थंडीची चाहूल लागली असतांना दुसरीकडे, वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडतांना दिसून येत आहे. श्वसनाचे, सर्दी, खोकल्यासह, दम्याच्या रुग्णांना त्रास होतांना दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणार्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणार्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन दिले आहे. राज्य सरकारने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी समोर आली आहे.
राज्य सरकारच्या खबरदारीच्या सूचना – मास्क वापरण्याला प्राधान्य द्या
सकाळी व सायंकाळी घराबाहेर चालणे टाळा
घराचे दरवाजे खिडक्या उघडू नका
दुपारी 12 ते 4 बाहेर पडण्याचा सल्ला
ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळण्याचे आवाहन
दिवाळीत फटाके फोडणे टाळण्याचा सल्ला
या 17 शहरांना प्रदूषणाचा धोका- राज्यातील 17 शहरांमध्ये प्रदूषण वाढले असून, यामध्ये मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, सोलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, चंद्रपूर, नवी मुंबई या शहरांचा समावेश आहे.
COMMENTS