भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर आता फायनलमध्ये कसे पोहोचायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. त्यामुळे
भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर आता फायनलमध्ये कसे पोहोचायचे, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. त्यामुळे आता भारतीय संघाला पाकिस्तान संघाबरोबर झालेला पराभव विसरावा लागेल आणि त्यानंतर फक्त श्रीलंकेच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. कारण जर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचायचे असेल तर त्यासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे भारताने पराभव विसरून जर श्रीलंकेच्या सामन्यावर भारताने लक्ष केंद्रीत केले तर त्यांच्यासाठी हे चांगले असेल. भारताला यापुढे या स्पर्धेत श्रीलंका आणि आफगाणिस्तान या दोन संघांबरोबर दान हात करावा लागणार आहेत. त्यामुळे या पराभवानंतर भारताचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

COMMENTS