गेवराई प्रतिनिधी - तलवाडा येथे वादळी वार्या सह गारपीट झाली या मध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली यामध्ये तलवाडा येथील शेत

गेवराई प्रतिनिधी – तलवाडा येथे वादळी वार्या सह गारपीट झाली या मध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली यामध्ये तलवाडा येथील शेतकरी तुळशीराम वाघमारे यांच्या शेतातील सौर पंप उखडून पडल्याने त्यांच्या सर्व पॅनल(पाट्या) खराब झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर असे की शनिवार दिनांक 10जून रोजी गेवराई तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला यावेळी गरा व वार्या मुळे अनेकांच्या घरांवरची पत्रे उडाली तर शेतातील झाडे उन्मळून पडली असून या वादळी वार्यात तलवाडा येथील शेतकरी तुळशीराम वाघमारे यांच्या गट नंबर 480 या क्षेत्रातील मुंद्रा कंपनी चां सोलर पॅनल सह उखडून पडल्याने त्याचे सर्व नुकसान झाल्याने कंपनी कडून त्यांच्या नुकसानी ची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी तुळशीराम वाघमारे यांनी केली आहे.
COMMENTS