जगभरात कोविड चे संकट अद्यापही कमी झालेले नाही. परंतु या पासून आपल्याला बचाव करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. संगमनेर शहरामध्
जगभरात कोविड चे संकट अद्यापही कमी झालेले नाही. परंतु या पासून आपल्याला बचाव करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. संगमनेर शहरामध्ये लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु असून आत्तापर्यंत शहरातील नागरिकांचे 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे .आता 40 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असून त्या नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या लसीकरण करून घ्यावे .असे आवाहन नगराध्यक्ष सौ तांबे यांनी केले आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोविशिल्ड व कोवक्सिन या दोन्ही लस चांगल्या असून त्यापैकी जी उपलब्ध असेल ती लस नागरिकांनी घ्यावी. या लसीबाबत अनेक अफवा नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत मात्र नागरिकांनी लस घ्यावी. जास्तीत जास्त लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले
COMMENTS