Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा या मागणीसाठी  राष्ट्रीय गुरु रविदास क्रांतीचा मोर्चा

यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ येथील रोशन बिनझाडे याच्या खूनप्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मृताचे कुटुंबीय दहशतीत आहे. या प्

नव्या पिढीची कविता प्रेरणा देणारी : कवी प्रकाश घोडके
निळवंडे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात
स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ येथील रोशन बिनझाडे याच्या खूनप्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मृताचे कुटुंबीय दहशतीत आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड व निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. बिनझाडे कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आरोपींवर मोक्का लावावा. मृताच्या कुटुंबाला 50 लाखाची मदत द्यावी, आरोपींना जामिन मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात यावा, रविदासनगर परिसरसतील अवैध धंदे बंद करावेत, कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

COMMENTS