Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वर महापर्यटन उत्सवाची समन्वयातून तयारी करावी : संतोष पाटील

सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार आ

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज
इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
15 व्या वित्त आयोगातून घंटा गाडी खरेदी; शेडगेवाडी ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद पाऊल

सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार आहेत. कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
महाबळेश्‍वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, अजित पाटील, सोनाली मेटकरी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उत्सव कालावधीत पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागांनी घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महाबळेश्‍वरला येण्यासाठी वाई, सातारा कोकणातून रस्ते आहेत. या रस्त्यांवरील कामे व महाबळेश्‍वर अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत. त्याचबरोबर महाबळेश्‍वर शहर सुशोभीकरण करावे. या उत्सवाला जास्तीत-जास्त पर्यटक येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिध्दी द्यावी. या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.
ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्या ठिकानाहुन पोहोचण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात यावी. बसमधून पर्यटकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोच करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. येणार्‍या पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा. महापर्यटन उत्सव महाबळेश्‍वर काम ज्या संस्थेला दिले आहे त्या संस्थेशी समन्वय साधून विविध विभागांनी उत्सवासंदर्भातील कामे पूर्ण करावी. संस्थेने विविध प्रकारच्या ऐतिहासिक थीमचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणचे प्रवेशद्वार तयार करावे. सांस्कृतिक कार्यक्रममध्ये स्थानिकांचा सहभाग घ्यावा. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पॉईंटचे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे. त्याचबरोबर कृषी विभागाने उत्सव काळात तृणधान्य महोत्सवाचे आयोजन ही करावे, अशा सूचना पाटील यांनी बैठकीत दिल्या.

COMMENTS