Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याची दहशतीने दर्डे कोर्‍हाळे परिसरात पिंजरा लावा

अरुणराव येवले यांनी केली निवेदनाव्दारे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः  तालुक्यातील  दर्डे कोर्‍हाळे परिसरातील चारी क्रमांक 8  माजी सरपंच साहेबराव शिंदे यांच्या वस्ती परिसरात बिबट्यांचा मुक्त संचा

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24
विकासाचा ‘संगमनेर पॅटर्न’ महाराष्ट्रालाही अनुकरणीय – आमदार थोपटे

कोपरगाव प्रतिनिधी ः  तालुक्यातील  दर्डे कोर्‍हाळे परिसरातील चारी क्रमांक 8  माजी सरपंच साहेबराव शिंदे यांच्या वस्ती परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून येथील जनजीवन व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण झालेले आहे, कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यावर रात्री अपरात्री बिबट्या ताव मारीत असल्याने घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तेव्हा राज्याचे वनमंत्री यांनी येथील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी तातडीने आवश्यकता उपाययोजना करून पिंजरा लावून या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे.
              माजी सरपंच साहेबराव शिंदे निवेदनात म्हणाले की, माझे मर्यादित कुटुंब आहे. बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात वाढल्याने मनामध्ये भीती तयार झाली आहे. कोपरगाव वन विभागाच्या अधिकारी, पोलिस स्टेशन तसेच प्रांताधिकारी शिर्डी यांच्याकडे पिंजरा लावून बंदोबस्त म्हणून मागणी केली.त्यावर संबंधित वनविभागाने असमर्थता दर्शवली आहे. परिसरातील बिबट्यांना येथे नेहमीची ये_-जा करण्याची सवय झाल्याने आम्हाला घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. या बिबट्याने आमच्या एकुलत्या एक मुलांमुलीवर हल्ला केला. तर काय होईल या भीतीनेच आमची गाळण उडाली आहे. असे असतांनाही प्रशासन, वनविभाग त्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.
                अरुणराव येवले पुढे म्हणाले की, बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबलेली आहेत आहे, कष्टकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शेतकरी, महिलांसह अबालवृद्धांना तसेच शाळेत ये-जा करणारे विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली आहे. भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांना त्याबाबत कल्पना देण्यात आली असून, त्यांनीही प्रशासकीय यंत्रणेच्या कानावर या संकटाची माहिती देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा. म्हणून मागणी केली आहे. मात्र अजुनही या बिबट्यांचा बंदोबस्त झालेला नाही.  येथील वनविभागाचे अधिकार्‍यांनी बिबट्याला मारता येत नाही. तसेच पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्याची परवानगी नाही असे सांगून हात वर केलेले आहे. त्यामुळे या परिसरात निर्माण झालेले बिबट्याचे संकट कसे दूर होणार हा कायमचा प्रश्‍न आहे. तेव्हा थेट वनमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या भागातील दैनंदिन जीवनमान अधिक सुरळीत कसे होईल हा प्रयत्न करावा. या बिबट्यापासून कायमची मुक्तता करावी. अशी मागणी अरुण येवले यांनी केली आहे.

COMMENTS