Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मताचे राजकारण सर्वांसाठी घातक

माजी नगराध्यक्ष वहाडणे यांचे वक्तव्य

कोपरगाव प्रतिनिधी ः द केरला स्टोरीच्या निमित्ताने संपूर्ण देशात संतापाची व जागृतीची लाट उसळलेली असतांना काही  लाचार नेत्यांनी मात्र गठ्ठा मतदारां

पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाडयांना थांबा मिळावा ः संध्या थोरात
खंडणी घेतली…व तीही चक्क फोन पे वरून…

कोपरगाव प्रतिनिधी ः द केरला स्टोरीच्या निमित्ताने संपूर्ण देशात संतापाची व जागृतीची लाट उसळलेली असतांना काही  लाचार नेत्यांनी मात्र गठ्ठा मतदारांना खुश करण्यासाठी या सिनेमावरच आक्षेप घेतलेला दिसतो त्यामुळे फक्त मताचे राजकारण सर्वांसाठी घातकच असल्याचे मत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी द केरला स्टोरी या हिंदी चित्रपटावरून सुरू असलेल्या देशभरातील चर्चेवर आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
या पत्रकात वहाडणे यांनी म्हंटले आहे की, देशातील अनेक राज्यात धर्मांतरण व लव्ह जिहादचा नंगानाच सुरू आहे.कोपरगाव शहरात तर लव्ह जिहादचे संकट अनेक हिंदु कुटुंबावर कोसळलेले आहे.त्या कुटुंबांना रा.स्व.संघ परिवारानेच आधार द्यायचा सातत्याने प्रयत्न चालविलेला आहे. राजकीय नेते मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत. केरला स्टोरी तील शालिनी हे पात्र काल्पनिक नसून केरळमधील चिंताजनक-संतापजनक सत्य घटना आहे. राजकीय नेत्यांनी व सर्वांनीच हे लक्षात घ्यावे कि, आपल्यालाही आई-बहिण-पत्नी-मुलगी आहे.आपण जागृत राहिलो नाही तर आपल्यापैकी कुणाच्याही घरावर धर्मांतर व लव्ह जिहादचा राक्षस चालून येऊ शकतो. त्यावेळी बोंबलत बसण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसेल.केरळ मधील हजारो मुली पळवून-धर्मांतर करून-बलात्कार करून इस्लामी देशात विकल्या गेल्या,इतकेच नव्हे तर काहींना दहशतवादी संघटनेत काम करण्यास भाग पाडण्यात आले. महिला-भगिनी ती कुठल्याही जाती धर्माची असो, तिच्याबाबत  गैरप्रकार-अन्याय-अत्याचार आपण सहन करता कामा नये. मतांचे गठ्ठे मिळवून कदाचित एखादे पद प्राप्त होईल, पण आपला परिवार-समाज-धर्म-शहर आणि भावी पिढी संकटात आल्याशिवाय रहाणार नाही. विशेषतः चोवीस तास राजकारण करणार्‍यांनी आपल्या वर्तनात-कृतीत बदल केला पाहिजे.या विषयाकडे राजकारण म्हणून न बघता  हे आपल्याच घरावर-भगिनींवर आलेले संकट आहे असे आपण सर्वांनीच मानले पाहिजे.जे जे समजदार-सुज्ञ मुस्लिम आहेत त्यांनीही चुकीच्या पद्धतीने वागणार्‍यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.कदाचित माझ्या या बातमीमुळे काही कुटिल राजकारणी मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरविण्याचे उद्योग करतीलही.पण हिंदू  असो की मुस्लिम कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिला मदत करणे आपले कर्तव्य आहे असेच मी मानतो. राजकारण महत्वाचे नसून आपल्या शहरातील सर्वांचेच एकमेकांशी सलोख्याचे संबंध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यात वहाडणे यांनी म्हटले आहे.

COMMENTS