देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः निळवंडे धरणातील पाणी बंदिस्त कालव्यांना निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी कधीही समर्थन देणार नाही. कालवे व चार्या होण्याक

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः निळवंडे धरणातील पाणी बंदिस्त कालव्यांना निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी कधीही समर्थन देणार नाही. कालवे व चार्या होण्याकरीता लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी पन्नास वर्ष संघर्ष केलेला आहे. काही लोकांकडून बंदिस्त पृच्छ कालवे व चार्यांचे समर्थन केले जात आहे. बंदीस्त कालवे करण्याबाबत लाभक्षेत्रात संभ्रम निर्माण करु नका, निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात येऊ घातले आहे. बंदिस्त कालवे लाभक्षेत्राच्या दृष्टीने घातक असून त्यामुळे लाभक्षेत्र उजाड होण्याची शक्यता असल्याची भीती निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी विलास गुळवे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली.
निळवंडेचे पाणी लाभक्षेत्र जिरले पाहिजे, पाणी जिरणे म्हणजे पाण्याचा अपव्यय हा एक जावई शोध लावला आहे. देशाचे तत्कालीन जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे कालवे व चार्या याबाबत लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर निळवंडे कालवे व चार्या बंदिस्त नसुन खुले राहणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळेच आज निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी झाली आहे. धरणाच्या आठ टिमसीवर 68 हजार हेक्टर क्षेत्र भिजवणे शक्य आहे. त्यानुसार आता घाट माथ्यावरील वाहुन जाणारे पाणी आडवल्याने पाणी वाढणार आहे त्यादृष्टीनेच खा सदाशिवराव लोखंडे प्रयत्नशील आहे. केंद्रीय जल आयोगाने हे क्षेत्र कमी करण्याची सुचना जलसंपदा विभागाला केली होती. त्यानुसार पृच्छ भागाचे क्षेत्र सर्वच कमी होत होते. त्याचा सर्वात मोठा फटका हा आवर्षण प्रवण क्षेत्रालाच बसत होता. हा अन्याय होऊ नये म्हणुनचं खा लोखंडे यांनी महाराष्ट्र सरकारकडून घाट माथ्यावरील पाणी अडवून पाणी वाढवले जाणार आहे. यासाठी कोणतेही क्षेत्र कमी न करता आम्ही हे क्षेत्र ओपन सिंचनाद्वारे भिजवू अशी कोणतीही पाण्याची अडचण राहणार नाही. प्रवाही सिंचनात पाण्याचे अनेक टप्प्यावर लाभ होतो. जमिनी मध्ये पाणी पातळीची वाढ होते. लाभक्षेत्रातील शेतकरी पन्नास वर्षापासून निळवंडेच्या पाण्याची वाट पाहत आहे.शेतकर्यांच्या हितासाठी निळवंडे चे कालवे व चार्या खुल्या पाहीजे. बंदिस्त कालवे व बंदिस्त चार्या च्या नावाखाली शेतकर्यांची फसवणूक करुन अजून किती काळ पाण्यावाचून वंचित ठेवणार असा थेट सवाल गुळवे यांनी केला आहे.
ठेकेदाराने शेतकर्यांच्या आडून आरोप करणे बंद करावे ः गुळवे – निळवंडे धरण ही काय कुणाची वडिलोपार्जित मालकी नाही. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्यासाठी आंदोलने व उपोषणे करण्याचा प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे त्यामुळेच व्यक्तीद्वेशातुन एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना न्याय कसा मिळेल यासाठी कार्य केले जावे.ठेकेदाराने शेतकर्यांच्या आडून आरोप करणे बंद करावे. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण केले जात असेल तर त्या उपोषणावर टिका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शेतकर्यांची दिशाभुल करीत असेल तर लाभक्षेत्रातील शेतकरी त्याची गय करणार नाही, असे गुळवे यांनी सांगितले.
COMMENTS